राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याचा उद्देश 2029-30 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचा असून 2047 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.