2 वर्ष लाईट नाहीत, खाण्या पिण्याचे वांदे, उपासमारीची वेळ ! आंतरजातीय विवाहामुळे सामाजिक बहिष्कार, दांपत्याची व्यथा ऐकून डोळ्यांत येईल पाणी

चंद्रपूर जिल्ह्यातील सरडपार गावात आंतरजातीय विवाह केल्याने एका जोडप्यावर अनेक वर्षांपासून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. सचिन आणि सुजाता यांना घरात वीज नसणे, आर्थिक दुर्बळता आणि मुलाला लसीकरण नाकारण्यासारख्या भीषण समस्यांचा सामना करावा लागतोय. पुरोगामी महाराष्ट्रातील ही धक्कादायक घटना समाजाच्या दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.