सांगलीतील कृष्णा नदीत गेल्या तीन दिवसांपासून हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. दूषित सांडपाणी, साखर कारखान्यांतील मळीमिश्रित पाणी आणि औद्योगिक सांडपाणी नदीत सोडले जात असल्याने ही घटना घडली आहे. यावर पर्यावरण विभागाने तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.