मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण केले. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला शुद्ध करून स्वभाषेचा अभिमान शिकवला. मराठी भाषेला ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा बनवून तिचे संवर्धन करणे, लोककला व साहित्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.