Sanjay Raut : मोदी-शहांनी केजरीवालांची माफी मागितली पाहिजे – संजय राऊत कडाडले

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची राऊस एव्हेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. पुराव्याअभावी ही केस पोकळ ठरवत कोर्टाने दोघांनाही क्लीन चीट दिली. यावर खासदार संजय राऊत यांनी मोदी-शहांवर कठोर टीका करत माफी मागण्याची मागणी केली. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने झाल्याचे राऊत म्हणाले, ज्याचा कोर्टाने पर्दाफाश केला आहे.