रात्री मुंबईच्या अटल सेतूवर नवी मुंबईहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील दोन प्रवासी सुखरूप बाहेर पडले. घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र आता वाहतूक सुरळीत झाली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.