जळगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गाला जोडणाऱ्या पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात झाला. एका कंटेनरने विरुद्ध दिशेने येत चार ते पाच वाहनांना धडक दिली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, एक कंटेनर चालक जखमी झाला आहे, तर किरकोळ जखमींना रुग्णालयात हलवले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.