टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा सामना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत आहे. हा सामना क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारा आहे. कारण या सामन्यातील विजेत्या संघाला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर पराभूत संघाचं पॅकअप होणार आहे. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.