कांद्यांचा बाजारभाव घसरले, शेतकरी संघटना आक्रमक

नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे कांद्याच्या बाजारभावातील घसरणीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याला प्रति क्विंटल ₹2500 उत्पादन खर्च येत असताना, केवळ ₹7-8 प्रति किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. शासनाने प्रति क्विंटल ₹1500 अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली आहे.