मेळघाटातील आदिवासींना न्याय मिळेना; बच्चू कडूंचा वनविभागाला घेरावाचा इशारा

मेळघाटातील आदिवासी बांधवांना पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. वनविभागाकडून होणाऱ्या त्रासाविरोधात बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हक्काचे पाणी न मिळाल्यास वनविभागाचे कार्यालय घेराव घालण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्रात हा अन्याय सहन करणार नाही, असे ते म्हणाले.