आज रंगपंचमीच्या दिवशी भारतात खंडग्रास आणि खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. हे वर्षातील दुसरे आणि शेवटचे ग्रहण आहे. अरुणाचल प्रदेशात खग्रास तर विदर्भात खंडग्रास ग्रहण पाहता येईल. मुंबईत मात्र ते दिसणार नाही. विदर्भात सायंकाळी 6.18 वाजता सुरू होऊन सुमारे दीड तास ग्रहण दिसेल. नागरिकांनी याचा आनंद घ्यावा.