उद्धव ठाकरेंनी मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदाचा दिलेला प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारला आहे. यामुळे ठाकरे बंधूंमधील तणाव वाढला असून, मनसेने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली आहे. या घडामोडीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला काही ठिकाणी नुकसान होण्याची, तर मुंबई महापालिकेत महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.