राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी हयात असताना नाकारलेले तीन नेत्यांचे (मनोज व्यवहारे, सुभाष मालपाणी, सचिन जाधव) राजीनामे आता पक्षाने मंजूर केले आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविरोधातील नाराजीतून हे राजीनामे दिले होते. कोणतीही विचारपूस न करता ते स्वीकारल्याने पक्षात खळबळ उडाली असून, अजितदादांच्या अनुपस्थितीत पक्षासमोरील आव्हाने वाढली आहेत.