इराण-इस्त्राईल युद्धाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि रत्नागिरीसह अनेक शहरांमध्ये इंधन दरवाढीची अफवा पसरली आहे. यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली. संभाव्य दरवाढीच्या भीतीने सामान्य नागरिक मोठ्या संख्येने पेट्रोल भरण्यासाठी धाव घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.