रोहित पवारांनी अजित पवार विमान अपघाताच्या एआयबी चौकशी अहवालावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. अहवालात अनेक त्रुटी असून, विमान पडलेल्या ठिकाणी झाडे नसून झुडूप होते, असा दावा त्यांनी केला. तसेच, अहवालातील टायपोग्राफिकल त्रुटी आणि तांत्रिक चुकांवर त्यांनी बोट ठेवले. योग्य आणि सखोल चौकशीची मागणी करत, मोठ्या ताकदवान व्यक्तींकडून वाचवावाचवीचा कार्यक्रम सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.