मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत पारा आणखी वाढण्याचा अंदाज असून, भारतीय हवामान विभागाने मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकणपट्ट्याला येलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आणि पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.