महाराष्ट्र राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुप्रिया सुळे, संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांनीही अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली. सात जागांसाठी होणारी ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.