टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला 7 गडी राखून पराभूत केलं. यासह भारताने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. खरं तर या हायस्कोअरिंग सामन्यात इंग्लंडने चांगली झुंज दिली. पण अक्षर पटेल आणि शिवम दुबेने घेतलेला झेल टर्निंग प्वाइंट ठरला.