संजय राऊत यांनी इराण-इस्रायल युद्धातील भारताच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांमध्ये युद्धखोरांविरोधात उभे राहण्याची हिंमत नाही. यामुळे देशाची निर्यात ठप्प झाली असून, शेतकरी व हजारो भारतीय परदेशात अडकले आहेत. सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.