भारतीय संघ टी 20 वर्ल्डकपची सेमीफायनल गाठू शकणार नाही असं भाकित मोहम्मद अमीरने केलं होतं. मात्र सेमीफायनलमध्ये भारत पोहोचलाच. त्यानंतर त्याने आणखी एक विधान केलं, इंग्लंड उपांत्य फेरीत भारताला हरवेल. पण त्याची ही भविष्यवाणीही चुकीची ठरली आहे.त्यानंतर नवजोत सिंग सिद्धू त्याच्यावर भडकला असून त्यांनी चांगलीच धुलाई केली.