राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या कर्जमाफी योजनेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना” असे नाव देण्यात आले आहे.