राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याची घोषणा, तसेच शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. सरकारने विविध योजनांसाठीही मोठ्या घोषणा केल्या. सत्ताधारी पक्षाकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधकांनी मात्र त्यावर टीका केली आहे.