रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!

रत्नागिरी शहरात युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम घरगुती गॅस पुरवठ्यावर झाला आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरपोच गॅस डिलिव्हरी होत नसल्याने, ग्राहकांना आठ दिवसांपासून रांगेत उभे राहून सिलेंडर घ्यावे लागत आहेत. या स्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.