राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ममता बॅनर्जींना धाकट्या बहिणीसारख्या संबोधत, पश्चिम बंगाल सरकार आदिवासींच्या भल्यासाठी लक्ष देत नसल्याचे म्हटले. संथाल परिषदेतील कार्यक्रमाच्या आयोजनावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती भाजपच्या माध्यमातून राज्याला बदनाम करत असल्याचा आरोप करत, पश्चिम बंगालमधील आदिवासी कल्याणाची माहिती दिली.