इराण-अमेरिका-इस्रायलमधील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या असून अनेक हॉटेल्स व लहान व्यवसाय बंद पडले आहेत. मुंबईत ३५% हॉटेल्स बंद झाली असून येत्या काही दिवसांत हे प्रमाण आणखी वाढू शकतं.