कुणी इथेनॉल, कुणी घासलेट तर वेस्टेड ऑईलपासून पेटवतोय शेगडी… डोकेबाजांनी लढवली अफलातून शक्कल

जागतिक युद्धामुळे इंधनाच्या वाढत्या किमती व गॅस टंचाईने भारताला ग्रासले आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात नागरिकांनी अभिनव उपाय शोधले आहेत. पालघरमध्ये टाकाऊ तेलापासून (वेस्ट ऑईल) बनवलेल्या शेगड्या, कोपरगावात इथेनॉल स्टोव्हचे संशोधन, तर मुंबईत केरोसिन आणि कोळशाचा वापर वाढला आहे.