इराण-इस्रायल युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेले भारतीय जहाज "शिवालिक" आज45 हजार टन एलपीजी घेऊन मुंद्रा बंदरात पोहोचणार आहे. भारत सरकारच्या यशस्वी राजनैतिक प्रयत्नांमुळे, युद्धक्षेत्रातून जहाजाचा सुरक्षित मार्ग मिळाल्याने देशातील सध्या सुरू असलेल्या एलपीजी संकटातून मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.