नंदूरबारच्या विसरवाडी बाजारात मुलांच्या खोडसाळपणामुळे मधमाशांनी अचानक हल्ला केला. यामुळे बाजारात मोठी घबराट पसरली आणि लोक जीव मुठीत घेऊन पळाले. या हल्ल्यात ५-७ जण जखमी झाले, तर एका दिव्यांग महिलेला ३०-३५ डंख लागल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे. चंद्रपुरातही पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.