राज्यातील गॅस टंचाईचा परिणाम आता खाद्य व्यवसायावरही दिसून येत आहे. मुंबईतील चर्चगेट परिसरातील खाऊगल्लीत अनेक स्टॉल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. काही ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्यामुळे कोळशाच्या शेगडीचा वापर करून व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर काही विक्रेत्यांनी स्टॉल उशिरा उघडण्याचा निर्णय घेतला आहे.