राज्यात गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असतानाच आता जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना दुहेरी फटका बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. किरकोळ बाजारात सूर्यफूल तेलाच्या किमतीत सुमारे 13 रुपयांची वाढ झाली आहे.