महाराष्ट्रात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा सत्ताधारी नेत्यांकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र समोर येत आहे. गॅसवर आधारित अनेक उद्योग ठप्प झाल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून ते मोठ्या प्रमाणावर मुंबई सोडून परतत आहेत.