Sangli | सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल

सांगली जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच इतर फळबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सलगर गावातील एका शेतकऱ्याच्या चार एकर द्राक्षबागेचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. पुढील दोन दिवसांत काढणी होणार असतानाच संपूर्ण बाग उध्वस्त झाली.