Chanakya Niti : ज्या लोकांना या दोन सवयी असतात, ते आयुष्यभर सुखी होऊच शकत नाहीत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाला आयुष्य जगण्याचा मार्ग सांगितला आहे. चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात जे आपल्या आयुष्यात कायम आनंदी असतात, तर असेही काही लोक असतात जे आपल्या आयुष्यात कायम दु:खी असतात.