सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाची विधानपरिषदेत गंभीर दखल घेण्यात आली आहे. विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेत सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले आहेत. त्यांनी मंत्री उदय सामंत यांना यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्याचे आदेश दिले.