TV9 Marathi
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीत जिंकणं-हरणं हा भाग असतो. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी एवढी लाचारी दाखवणे योग्य नाही. कोणावर हल्ला करण्याचा किंवा जीव घेण्याचा कट रचणे हे पूर्णपणे अयोग्य आहे.”
Go to News Site