TV9 Marathi
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट भूमिका घेत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्याची अट ठेवली आहे. “ही अट चुकीची नाही, उलट तिची गरजच नव्हती,” असे त्यांनी सांगितले. सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत निवडणुकीपूर्वी संवाद साधला नसल्याचा आरोप केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत अपघाताच्या चौकशीबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Go to News Site