TV9 Marathi
नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 8 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास जमिनीला हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये हा धक्का प्रकर्षाने जाणवला.
Go to News Site