TV9 Marathi
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत असल्याचे विधान केले आहे. या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सपकाळ यांनी सांगितले की, वारकरी संप्रदाय हा नेहमीच पुरोगामी विचारांना पुढे नेणारा राहिला आहे. “या संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला असून संत परंपरेच्या माध्यमातून समाजाला समतेचा संदेश दिला आहे,” असे ते म्हणाले.
Go to News Site