TV9 Marathi
मुंबईत भाजपाने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नारी शक्ती वंदन आणि मतदारसंघ पुनर्रचना दुरुस्ती विधेयके नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात भाजपाचे वरिष्ठ नेते आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चादरम्यान एका महिलेने अचानक रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केल्याने प्रकरण चर्चेत आलं. संबंधित महिलेने मोर्चेकऱ्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगत आक्रमक भूमिका घेतली.
Go to News Site