TV9 Marathi
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, चालकांना ग्राहकांशी मराठीत संवाद साधणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. या निर्णयाला विरोध करत काही संघटनांनी 4 मेपासून सुमारे 15 लाख रिक्षाचालक संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
Go to News Site