TV9 Marathi
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कामगिरीबाबत मोठा दावा केला. पत्रकारांशी संवाद साधताना शाह यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील 152 जागांपैकी भाजप सुमारे 110 जागा जिंकत असल्याचा अंदाज पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. तसेच, राज्यात सध्या सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा पराभव होऊन भाजप सत्तेत येईल, असा दावा त्यांनी केला.
Go to News Site