TV9 Marathi
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी आपला पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या राजकीय घडामोडींना वेग आला असून बच्चू कडू लवकरच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.
Go to News Site