TV9 Marathi
महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत उमेदवारीवरून मतभेद उघड झाल्याचे चित्र समोर आले आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत होत असल्याची चर्चा होती. काँग्रेसनेही उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असल्यास त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर न जाण्याचा निर्णय कायम ठेवत शिवसेनेतून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे महाविकास आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, काँग्रेसची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Go to News Site