TV9 Marathi
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याप्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. राज ठाकरेंनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. फास्टट्रॅक कारवाईच्या सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी आणि बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीवर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. कायद्याचा धाक उरला नसल्याचे सांगत, समाजाचे ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ भरकटल्याचे ते म्हणाले.
Go to News Site