TV9 Marathi
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या निकालावरून पंतप्रधान नरेद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपवर सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून निवडणुका जिंकत असल्याचा गंभीर आरोप केला. “भाजप 365 दिवस फक्त निवडणुका जिंकण्याचा सराव करत असतो. देशाचे गृहमंत्री 20-20 दिवस बंगालमध्ये राहतात. अशा परिस्थितीत ही खरी लोकशाही निवडणूक म्हणता येणार नाही,” असे ते म्हणाले.
Go to News Site