TV9 Marathi
राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, सातारा आणि परभणी जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. सातारा शहरातील सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरात काल सायंकाळी झालेल्या जोरदार वादळामुळे सुमारे 40 घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवर झाडे आणि विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Go to News Site