TV9 Marathi
बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. “मी त्यांना घरी बोलावून मंत्री केलं, ही माझी चूक होती,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच लोभापायी गेलेल्यांना जाऊ द्या, कार्यकर्ते माझ्यासोबत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Go to News Site