TV9 Marathi
नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभावाच्या मागणीसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीच्या गारपीट आणि नैसर्गिक संकटांमुळे आधीच मोठं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता कांदा आणि इतर पिकांना मिळणाऱ्या कमी दरांचा फटका बसत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Go to News Site