TV9 Marathi
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून तपासासाठी सीआयडीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Go to News Site