TV9 Marathi
राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून, अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलनकर्ते आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर असून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
Go to News Site